उत्तरप्रदेशातील भट्टा-परसौल गावात पोलिसांनी महिलांवर अत्याचार केले अन् नागरिकांना जिवंत जाळले - राहुल गांधी

Wednesday, May 18, 2011

राजकीय लाभासाठी खोटे बोलून हीनतेचा कळस गाठणारे राहुल गांधी !
राहुल गांधी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे इंग्रजी दैनिकाचे प्रतिपादन !

ग्रेटर नोयडा, १८ मे - उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोयडा नजीकच्या भट्टा-परसौल गावात पोलिसांनी अनेक महिलांवर बलात्कार केले आहेत. तेथे किमान ७४ नागरिकांना जिवंत जाळण्यात आले आहे. लोकांना अमानुष
मारहाण करण्यात आली आहे. लोकांची घरे तोडण्यात आली आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ११ मे या दिवशी केला होता. याविषयी त्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार करून या घटनांशी संबंधित छायाचित्रेही दाखवण्याची सिद्धता दर्शवली होती.
त्यांच्या या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी प्रसिद्ध इंग्रजी नियतकालिक 'दी टाइम्स ऑफ इंडिया'ने स्वतःच्या पत्रकारांचे पथक पाठवले हो [...]



 
 
 

Popular Posts